Monday, October 31, 2011

परप्रातिंयांची मुजोरी..




संजय निरुपम या काँग्रेस खासदारानं नागपूरातल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात परप्रातियांचा मुद्दा पुन्हा काढला..मुंबईतल्या उत्तर भारतीयांनी जर मनात आणलं तर मुंबई बंद करु शकतो अशी दर्पोक्ती या महाशयांनी केली..खरं तर निरुपम हा एक वाचाळ माणूस....तोंड उघडलं की वाद हाच त्याचा शिरस्ता होऊन बसलाय..पण निरुपम यांनी मुंबई बंद करण्याची भाषा करण्यामागं राजकारण आहे हे सांगायला आता उत्तर प्रदेशातल्या गागा भट्ट यांना विचारण्याची गरज नाही...कारण सोप्पं आहे..तीन चार महिन्यावर मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आलीय..आणि मुंबईची निवडणूक म्हटलं..की सर्वच पक्षांना ती जिंकण्याची ईर्शा होणारच..शिवसेनेचा तर तो अर्थ वायूच आहे..आणि मुंबई फक्त शिवसेनाच बंद करु शकते हा त्यांचा आवाज...पण त्यालाच निरुपम यांनी आव्हान दिलं म्हटल्यावर सेना गप्प बसेल कशी...त्यांनीही निरुपम यांचे दात घशात घालण्याची तंबी दिली...त्यात राज ठाकरे यांनीही लवकरच फटाके फोडू अशा इशारा दिलाय..त्यामुळे हा वाद आता मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत रंगणार हे मात्र नक्की....
हा झाला निवडणुकीचा मुद्दा..पण मुळात या संजय निरुपम काय कृपाशंकर सिंग काय आणि अबू आझमी काय..या लोकांचा आवाज वाढतोच कसा हे महत्वाचं...मुंबईत परप्रांतियांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यांच्याजिवावर नेतेगिरी करण्याचा ह्या तिघांचा राजकीय धंदा सुरुय.. पण निरुपम यांच्या भाषेत जी मग्गुरी आहे ती जरा जास्तच आहे...कोण तो उपटसुंभ कुठुन आला तो...आणि मुंबई बंद करण्याची भाषा काय करतोय...या महाशयांना एवढा माज आला तरी कुठुन...ह्याच निरुपम नावाच्या महाशयांनी यापूर्वी छट् पूजेच्या निमित्तानं राजकीय शक्तीप्रदर्शन मांडलं होतं..आता पुन्हा निवडणुका..या निवडणुकीच्या तोंडावर असे वाद निर्माण करायचे आणि स्वताचं उखळ पांढरं करुन घ्यायचं हा त्यांचा धंदा सुरु झालाय.. सध्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद किंवा गुरुदास कामत यांच्यामुळे रिकाम्या झालेल्या मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठीही या निरुपम महाशयांची बडबड सुरु आहे..त्यातच मुंबईत उत्तर भारतीयांचा कैवारी मिच आहे हे दाखवण्यासाठीही त्यांचा हा आटापीटा आहे..
खरं तर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनीच या निरुपम महाशयांचे कान उपटायला पाहिजे पण काँग्रेस मध्ये असा एकही नेता नाही जो अशा लोकांना लगाम लावू शकेल.. त्यामुळेच अशा माणसांची मुजोरी वाढतेय.. बरं या उत्तर भारतीयांना नाराज करण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही...राहता राहिला मनसे.. सध्या मनसेचं इंजिनच या उत्तर भारतीयांची गाडी रुळावरुन खाली खेचू शकतं..त्यामुळे निरुपम यांनी दिवाळीत टाकलेल्या या ठिगणीवर राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठे बॉम्ब फोडणार हे मात्र नक्की...राज ठाकरे यांनीही तसे संकते दिलेलेच आहेत..त्यांचा दारुगोळाही भरलेलाच आहे.. त्याला निरुपम यांनी ठिगणी टाकल्यामुळे हा दारुगोळा आता उडणार आणि त्यात कोणाकोणाची वाट लागणार हे या दोन महिन्यात दिसणार आहे..

No comments:

Post a Comment