Friday, October 7, 2011

शिवसेनेचा दसरा मेळावा..




दरवर्षीप्रमाणं यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला..दसरा मेळावा-शिवसनैनिक आणि बाळासाहेब ठाकरे हे नातं शिवसेनेच्या स्थापनेपासूनचं आहे आणि ते आजतागायत आहे..सेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसनैकांमध्ये उत्साह निर्माण करणारा जसा असतो तसाच तो प्रसिद्धीमाध्यमांसाठी बातम्यांची मोठी शिदोरीच असतो..आतातर २४ तास वाहिन्यांसाठी हा दसरा मेळावा पर्वणीच झालाय..दसरा मेळावा म्हटलं की बाळासाहेबांचा झंझावात...या झंझावातात ते कोणा-कोणाची वाट लावतात..ते ऐकणं शिवसैनिकांसाठी महत्वाचं असतं..पण याच दसरा मेळाव्याच्या भाषणातून बाळासाहेबांनी अनेक वादही निर्माण केलेत..खरं तर दसरा मेळाव्यातल्या बाळासाहेबांच्या भाषणानंतर वाद झाला नाही असा दसरा मेळावा कधी झाला नाही..यावेळीही ते नेहमीप्रमाणे आपल्या खास ठाकरे शैलीत सर्वांची पिसं काढणार असाच सर्वांचा होरा होता..पण बाळासाहेबांचं या दसरा मेळाव्यातलं भाषण मात्र नेहमीच्या भाषणापेक्षा खूपच सौम्य होतं..आर आर पाटील, मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांचं त्यांनी व्यंग केलं पण तेही थोडक्यातच..त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला..पाच सहा महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर ठाण्याची निवडणुक आणि या वर्षभरात एकूण दहा महानगरपालिका तसच जिल्हा पिरषद निवडणुकीचा फड रंगणाराय..मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेचा प्राणवायुच आहे.. त्यामुळे बाळासाहेब त्याच अनुशंगानं काही बोलतील असं वाटत होतं..पण त्याचा त्यांनी ओझरता उल्लेख केला आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा महापालिका जिंका असा आदेश आपल्या सैनिकांना दिला..
मुंबईतल्या मुळ कोळी, आगरी, भंडारी या समाजाचा त्यांनी आवर्जून उल्लेख करुन आपली व्होट बँक शाबूत करण्याचा प्रयत्न केला..तसच कसाब, अफजलचा विषय काढून पुन्हा एकदा हिंदुत्ववाद सोडलेला नाही असंच त्यांनी दाखवून दिलं....पण याच निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे त्यांची मोठी डोकेदुकी ठरणाराय. त्यामुळे या भाषणातही बाळासाहेब राज ठाकरेंवर तुटुन पडणार असं वाटलं होतं..पण त्यांनी राज या विषयाला हातही घातला नाही.. तसं पाहिलं तर सेनेच्या इतर नेत्यांच्या भाषणातही राज ठाकरेंचा फारसा उल्लेख आला नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं..कदाचित राज ठाकरेंना फारसं महत्व द्यायचं नाही असचं सेनेनं ठरवलं असावं असं दिसतय. कारण मागच्या चार पाच वर्षात राज ठाकरेंवर उद्धव किंवा बाळासाहेब यांनी केलेल्या टीकेचा फायदा राज यांनाच झाल्याचं दिसतय..त्यामुळेही असेल कदाचित..किंवा मुंबई- ठाण्यात जर सत्ता मिळवण्यात काही अडचण आली तर अंबरनाथ पॅटर्नप्रमाणं मनसे हा शिवसेनेचा आशेचा किरण असू शकतो..काहीही असो बाळासाहेब यांनी जसा राज ठाकरेंचा विषय टाळला तसा इतर राजकीय विरोधकांवरही ते फारसं बरसले नाहीत..
भिमशक्तीबरोबर युती होत आहे. त्याचा त्यांनी उल्लेख केला, पण दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीस मात्र त्यांनी कडाडून विरोध केला..एवढाच काय तो वादाचा मुद्दा सोडला तर बाळासाहेंबांच्या भाषणातून फार मोठं काही निघालं नाही..पण राजकीयदृष्ट्या ते एक संतुलित भाषण होतं.. पण बाळासाहेबांचं भाषण जे असतं ते हे भाषण वाटलं नाही हे मात्र तेवढचं खरं..

No comments:

Post a Comment