Saturday, August 27, 2011

अन्ना तुमचा लढा मोठा आहे



अन्ना हजारे यांचे उपोषण आज १२ व्या दिवशीही सुरु आहे, भष्ट्राचार संपला पाहिजे यासाठी त्यांचा हा लढा सुरु आहे , पण सरकार त्याकडे फारसं लक्ष देत नाही , पंतप्रधान पत्र लिहून उपोषण मागे घ्या असे आवाहन करत आहेत पण त्यांच्या मागण्या मान्य करत नाही हे सरकारचे दुटप्पीपण आहे , कांग्रेसला जर अन्नाची चिंता असती तर यातून तोडगा निघाला असता , पण भ्रष्ट्राचार मिटावा असे कांग्रेस काय कोणत्याच राजकीय पक्षाला वाटत नाही , त्यामुलेच ११ दिवस झाले तरी तोडगा निघत नाही, काहिजन अन्नावर आता टिका करत आहेत , ते हेकेखोर आहेत, त्यांच्या मागण्या वाढत आहेत, ते संसद आणि लोकशाहीला आव्हान देत आहेत असे अनेक आरोप केले जात आहेत , पण एक ७४ वर्षाचा माणुस ११ दिवसापासून उपाशी आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही, संसदेत अन्नाच्या मागन्यावर चर्चा कोणत्या नियमाखाली करायची यावर चर्चा काय ? विरोधक तर काय त्यांची राजकीय भाकरी भाजत आहेत , शिवसेनाच बघाना आजपर्यंत अन्नावर टिका करत आला आंणि आज त्यांना पाठिंबा देत आहे, यात शरद पवार यांचा आवाज मात्र बंद ,एवढा मोठा नेता पण दिल्लीत आवाज नाही , सुशीलकुमार शिंदे एक चकार शब्द नाही , कुठे गेले हे नेते ? का त्यांची तोंडे बंद आहेत ? याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे , दुसरे महाशय नारायण राणे त्यानी तर अन्नावर तोंड सुखच घेतले॥ काय हे महाराष्ट्रातले नेते, अन्ना हजारे यांनी महाराष्ट्र किती महान आहे हे पुन्हा दाखवले, अन्ना हजारे यांच्या समोर आपले हे नेते मात्र आता खुपच खुजे वाटत आहेत, पण अन्ना सारा देश तुम्हाला आज सलाम करत आहे यातच तुमचे मोठेपण आहे ,,

No comments:

Post a Comment