Tuesday, August 30, 2011

अण्णा हजारेंवर टीका करणारे महाभाग




अण्णांनी जनलोकपालसाठी केलेल्या आंदोलावर आता टीका करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केंद्रीय ग्रामिण विकासमंत्री जयराम रमेश यांनी आत्ता अण्णांवर टीका केलीय. काय तर म्हणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील एनआयए ही लोकपालवर काम करत होती. तेच विधेयक अण्णांनी जनलोकपाल म्हणून सादर केल्याचा जावई शोध या जयराम रमेश यांनी लावलाय. आता हे रमेश कोण हे सांगायला नको, हे महाशय काँग्रेसचे निष्ठावन. त्यांना दिल्लीच्या राजकारणात फारसं कोणी ओळखत नव्हते. पण पर्यावरण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार मिळाल्यानंतर या महाशयांनी पर्यावरण बचावचा नारा देत अनेक मोठ्या प्रकल्पांची गोची केली. मोठा गाजावाजा करुन काही प्रकल्पाला स्थगिती दिली. अर्थात त्यात काँग्रेस विरोधी राज्यातील प्रकल्पांचीच संख्या जास्त होती..ओडीशातील पोस्को प्रकल्पाचे उदाहरण देता येईलं.. महाराष्ट्रातील प्रकल्पलाही ह्या महाशयांनी खो घातला. यात लवालाचे नाव घेता येईलं . नवी मंबई विमानतळालाही यांनी पर्यावरणाच्या नियमाखाली आणून परवानगी देण्यास टाळाटाळ केली.. पण शेवटी त्यांना परवानगी द्यावी लागली..पण लवासाचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो शरद पवार यांच्याशी निगडीत आहे म्हणून कदाचित त्यांनी लवासावर निर्बंध आणले..पण ह्याच महाशयांनी जैतापूरकडे कानाडोळा केला.. जयराम रमेश यांनी असा विरोधाचा धडाका लावला पण हायकमांडचे हितसंबंध असलेल्या प्रकल्पांना त्यांनी वाट मोकळी करुन दिली..जशी नवी मुंबई विमानतळ आणि जैतापूर..त्यातच भूसंपादन विधेयकही ह्या महाशयांनी राहुल गांधी यांना दाखवून संमत करण्याचा घाट घातला.. रमेश यांची ही पार्श्वभूमी देण्याचे कारण हे की जे विधेयक ते सोनिया गांधी यांच्या एनआयएचे आहे असं म्हणत आहेत. त्याची घटनात्मक वैध्यता काय. तीही एक सिव्हिल सोसायटीच आहे..मग अण्णांच्या सिव्हिल सोसायटीला विरोध का..आणि जर सोनियांकडून हे विधेयक येणार होते तर मग काँग्रेसवाल्यांनी अण्णांनी ते आणले म्हणून विरोध केला काय..शेवटी विधेयक हे महत्वाचे ना..सोनिया काय अण्णा काय, विधेयक कोणीही आणू..तेच विधेयक अण्णांनी आणले असा जर तुमचा दावा आहे तर काँग्रेसवाल्यांनी एवढं आकाश पाताळ एक का केलं..आम्हाला माहित आहे की अशा प्रकारची बाष्पळ बडबड करुन तुम्ही तुमच्या हायकमांची शाबासकी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे..असो..
आता पहा दुसरा विरोधक.. महेश भट्ट असं ह्या महाभागाचं नाव..ह्या महाभागाने अण्णांना हिंदुत्ववादी, गांधीशी तुलना कशाला वैगेरे म्हणून आपली अक्कल पाजळली..ह्या महाभाची अण्णा या विषयावर बोलण्याची लायकी तर आहे का..पण नाही उचलली जीभ लावली टाळ्याला...हा महेश भट्ट नावाचा माणूस कोणत्या तरी अंग्रेजी सिनेमाच्या सीडी पाहतो आणि त्याची नक्कल हिंदीत करतो तो महेश भट्ट.. ह्या महाभागाला अण्णांवर टीका करण्याचा मोह आवरला नाही..पण कमीत कमी टीकेची पातळी तर योग्य असावी..पण मानवी अधिकाराच्या नावाखाली तिस्ता सेटलवाड नावची बाई जो धिंगणा घालत असते तसाच धिंगाणा हा महेश भट्ट धालत असतो..या दोघांची नाळ एकच..हिंदुत्ववादी ठरवून एखाद्याला झोडपण्याचा धंदा मात्र या दोघांचा सारखाच.. वर परत अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा नारा करायला मोकळे...पण तुमच्या अशा बोंबलण्यानं अण्णांचे महत्व कमी होणार नाही..सुर्यावर थुंकल्याने सुर्याला काय फरक पडतो काय.. काय समजले ना खर्जुले महेश भट्ट आणि काँग्रेसचे पाळीव---- जयराम रमेश...

No comments:

Post a Comment