Friday, September 2, 2011

सभ्य माणसाच्या खेळातील असभ्य प्राणी






इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारतीय खेळाडूंना गाढव म्हणून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिलीय. मुळात नासिर हुसेन हे महाभाग इंग्लंडविरुद्ध भारत टी- २० सामन्याचे समालोचक होते. त्यावेळी केविन पिटरसनचा एक झेल पार्थिव पटेलने सोडला..त्यावर काँमेंट्री करताना नासिर महाशहयांचा तोल गेला आणि त्यांनी भारतीय संघात दोन-तीन गाढव खेळाडू असल्याचे म्हटले.. मुळात नासिर महाशयांना हे माहित असायला हवे की त्यांनी सामन्याचे समालोचक म्हणून काम करत असताना काही पथ्ये पाळायला हवी. पण त्यांनी पाळली नाहीत.. भारतीय संघात गाढव असतील नाही तर आणखी कोणतेही प्राणी असतील.. हार जीत ही सामन्यात होत असतेच.. त्यातच भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये नाही..त्यामुळे त्यांच्याकडून सुमार दर्जाची कामगिरी झाली. इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतः भारतानं सपाटून मार खाल्ला. त्याची शहानिशा व्हायला हवी..पण समालोचकाने अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे..नासिर महाशयाच्या या पराक्रमानंतर त्याचे क्रिकेट जगतात पडसाद उमटणे साहिजक आहे.
अनेक माजी क्रिकेटपटूंनी नासिरची खरडपट्टी काढली तर बीसीसीआयनंही नासिरच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे..कदाचित नासिरला माफी मागावी लागेलही..पण गोऱ्यांचा तोरा मात्र काही जात नाही..मुळात ह्या महाभागाचा जन्म भारतातच चेन्नई शहरात झाला..पण त्याच्या बोलण्यात सभ्यता दिसली नाही..ऑस्ट्रेलियाच्या एका माजी खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या हसिम आमलाचा अतिरेकी असा उल्लेख केला होता तोही समालोचक असताना, त्यानंतर त्याला माफी मागावी तर लागलीय पण ज्या चॅनलसाठी तो काँम्रेंट्री करायचा त्यांनी त्याला हाकलले..हा काही पहिला प्रसंग नाही..गोऱ्या लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटवर सध्या आशिया खंडांचे वर्चस्व आहे. त्यातच बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. आयसीसीवर सुद्धा बीसीसीआयच्याच धोरणांचा प्रभाव असतो..त्याचा अनेक गोऱ्या देशांना प्रंचड राग आहे. त्यांच्या मनातली खदखद अशी अधून मधून बाहेर येत असते. पण सभ्य माणसाच्या खेळात असे असभ्य प्राणी का असावेत नाही का..आणि जर असतील आणि त्यांच्यामुळे क्रिकेट बदनाम होत असले तर त्यांना खड्यासारखे बाहेर काढलेच पाहिजे...

No comments:

Post a Comment