Friday, February 22, 2013

हैदराबादच्या स्फोटानं जागवल्या आठवणी...


हैदराबाद गुरुवारी संध्याकाळी दोन बॉम्बस्फोटानं हादरलं..दिलसुखनगर भागात हे दोन बॉम्बस्फोट झाले..याच दिलसुखनगरशी माझं खूप जवलचं नातं आहे..याच भागात मी 9 वर्षे राहिलोय..त्यामुळं स्फोटाची बातमी समजात अंगावर शहारे आले...कारण ज्या ठिकाणी हे स्फोट झाले त्याच्या प्रत्येक जागेवर..इंचा इंचावर मी फिरलोय..तिथच शॉपिंग केलय..तिथचं साईबाबा मंदिरात अनेकदा दर्शनाला गेलोय..त्याच आनंद टिफीन सेंटरमध्ये अनेकदा भरपेट ताव मारलाय...ज्या थिएटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले त्याच थिएटरमध्ये तेलुगु चित्रपट पाहिलेत..बॉम्बस्फोटाची बातमी एकल्यानंतर लगेच त्या सर्व जागांची आठवण आली...
 
असाच मोठा बॉम्बस्फोट 25 ऑगस्ट 2007 मध्ये हैदराबादमध्ये झाले होते..दोन बॉम्ब फुटले..तर तिसरा याच वेंकटाद्री थिएटरसमोर ठेवला होता..त्यावेळी तो निकामी करण्यात आला..पण यावेळी त्या हरामखोरांनी डाव साधला....इतर ज्या दोन ठिणी स्फोट झाले आणि तिथं रक्ताचा सडा सांडला होता...त्यातलच एक होतं कोटी भागतलं गोकुळ चाट भांडार...नेहमी खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते..तिथच स्फोट झाला होता..त्याची आठवण आली म्हणून मागच्या वर्षी लिहिलेला हा ब्लॉग पुन्हा देतोय.......

आठवण हैदराबादची

हैदराबादमध्ये चाट भांडार भरपूर आहेत. शहरात जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येतया सर्वांवर एक उपाय म्हणजे कोटी भागातालं गोकुळ चाट...इथं मिळणारे सर्वच पदार्थ चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे.. त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..

गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ठरलेलीच..त्यामुळे या गोकुळशी जिव्हाळ्याचं नातं जडलयपण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं...माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला... ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागलातेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो

गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतोत्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज येतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी ते इथं येतात..अशाच एका संध्याकाळी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं…. अनेकजण याच गर्दीत आपली प्लेट फस्त करण्यात मग्न होतेत्याचवेळी  गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला…..कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं..सगळीकडे एकच गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होतेगोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होताआणि अपेक्षीत वेळी त्यांनं त्याचा स्फोट घडवून आणला..जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला..काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटलेकाहीजण भाजून काळे ठीक्कर पडले.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला....गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागलेमी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो तिथला शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेलाइंजिनिअरिंगचा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. गोकुळमध्ये मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर…! भितीनंच मी गार पडलो...नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाची चव लागत नव्हती..त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका आली.... खातानासुद्धा मला त्या भयाण घटनेची आठवण होत होती...

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतलातिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय...का कोण जाणं पण आता त्या गोकुळमधल्या कोणत्याच पदार्थावर ताव मारण्याचं मनच होत नाही….

दिलसुखनगरच्या स्फोटाची बातमी एकल्यानंतरही माझं मन सुन्न झालं..पुन्हा दिलसुखरनग डोळ्यासमोर तरळलं....दिलसुखनगरच्या आठवणी लवकरच शेअर करेन....

 

1 comment:

  1. हैदराबाद्या स्फोटाची बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झालं..यात बळी जातोय तो फक्त निष्पाप लोकांचा...

    राधा परांजपे..गुलबर्गा..

    ReplyDelete