Showing posts with label भाजप. Show all posts
Showing posts with label भाजप. Show all posts

Saturday, April 4, 2015

अडवाणींची सद्दी संपली

लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी म्हणजेच भाजप असं चित्र या पक्षाच्या स्थापनेपासून राहिलं आहे.पण मोदींच्या उदयानंतर भाजपमधलं हे चित्र बदललं आणि अडवाणींची अवस्था अडगळीत पडलेल्या फर्निचरसारखी झालीय.  भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक बंगळूरूमध्ये होते आहे. पण या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मार्गदर्शन करणार नाहीत.

भाजपच्या स्थापनेपासून आतापर्यंत अडवाणी आणि वाजपेयी हेच मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. पण आता मात्र अडवाणींच्या मार्गदर्शनाशिवायच ही बैठक होणाराय. कालपर्यंत अडवाणींचाच पक्षात शब्द प्रमाण मानला जायचा. अडवाणी अध्यक्ष असो वा नसो भाजपमध्ये त्यांचा शब्द हा आदेशच होता.एवढचं काय पंतप्रधान वाजपेयी असतानाही महत्वाच्या निर्णयात अडवाणींचा शब्द चालत होता. पक्षाचा आक्रमक हिंदू चेहरा अशी अडवाणींची ओळख होती.ज्या पक्षाच्या दोन खासदारांवरून 200 पर्यंत मजल मारण्यात अडवाणींचा सिंहाचा वाटा होता. त्यांची पक्षातली आजची अवस्था पाहवत नाही...1989 पासून भारतीय राजकारण नवं पर्व आलं. भाजपचा जर संपूर्ण भारतभर प्रसार करायचा असेल तर एखादा मोठा मुद्दा हाती असला पाहिजे हे अडवाणींनी हेरलं आणि भावनिक आणि तितकाच धार्मिक असलेला राम मंदिराचा मुद्दा त्यांनी हाती घेतला. अयोध्येत राम मंदिर झालेच पाहिजे यासाठी अडवाणींनी देशभर रथयात्रा काढली. या रथयात्रेनंतर देशातलं राजकारण ढवळून निघाली आणि भाजपचा जनाधारही वाढला.राम मंदिराचा मुद्दा जरी मंडल आयोगामुळं ओबीसी मतांच्या धृवीकरणाला शह देण्यासाठी घेतला होता.या रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला..त्यानंतरही अडवाणींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर रथयात्रा काढून अख्खा भारत पिंजून काढला..या सर्व रथयात्रांचा परिणाम म्हणजेच आधी 1996 नंतर 1998 आणि 1999 असं तीनवेळा भाजपनं मित्रपक्षांबरोबर आघाडी करून केंद्रात सत्ता स्थापन केली..अर्थात पहिलं सरकार फक्त 13 दिवसच राहिलं. पण त्यानंतर दीड वर्ष आणि 1999 नंतप पाच वर्ष भाजपनं केंद्रात सत्ता राखली. याचं सर्व अडवाणींचं होतं हे नाकारता येणार नाही...भाजपाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यात अडवाणींचाच मोठा वाटा असला तरी 2004 च्या निवडणुकीत भाजपला यश मिळाला नाही..2004 नंतर अडवाणी पीएम अन वेटींग म्हणजे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण 2009 मध्येही भाजपचं काहीच चाललं नाही..सलग दोनवेळा भाजपचा पराभव झाल्यानं संघ परिवारातून अवडाणींच्या नेतृत्वाला शह देण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. त्यातच पाकिस्तान भेटीत बॅरिस्टर जीना हे धर्मनिरपेक्ष नेते होते असल्याचं अडवाणींचं वक्तव्य त्यांच्या अलंगट आलं..त्यानंतर हळूहळू नरेंद्र मोदींचा प्रभाव वाढू लागला आणि 2014 च्या निवडणुकीच्या आधीच गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींना प्रचारप्रमुख करण्यात आलं..अडवाणींचा तीव्र विरोध असतानाही संघाच्या आदेशामुळं मोदींचा राज्याभिषेक झालाच..त्यानंतर संघाच्या आदेशानुसार अडवाणींना कोणतीच महत्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. आज अडवाणींची अवस्था पाहवत नाही. घरात अडगळीत पडलेल्या फर्निचरसारखी त्यांची अवस्था झालीय..अडवाणीही ”हेची फळ काय मम तपाला” असचं म्हणत असतील....   

Sunday, July 6, 2014

मुंबईत फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण !!!!



 

सत्तेचा माज कसा चढतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्य...मुंबई शहरात पाच रुपयां पोटभर जेवायला मिळतं असं भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्टयलय..हे शेलारसाहेब मुंबईचेच...यांचं आयुष्य या शहरातच गेलं...सध्या ते मुंबईचे भाजप अध्यक्ष आणि आमदार आहेत...मुंबईमध्ये सामान्य माणसाचं खाणं म्हणजे वडापाव. ..हा वडापावही 5 रुपयांना मिळत नाही याची शेलारांना माहिती नाही.. कारण हा वडापाव 10 रुपयांच्या खाली कुठंही मिळत नाही..मग मुंबईत पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं कुठं हे त्यांनी सांगायला हवं...या शेलारांनी मागच्या काही वर्षांत पाच रुपये तरी बघितलेत आहेत का. कालपर्यंत विरोधीपक्षात असताना उठसुठ काँग्रेसवर तोफ डागणा-या भाजपची दिल्लीत पूर्ण बहुमतानं सत्ता आल्यापासून त्यांची भाषा बदललीय...एका महिन्यात सत्तेचा माज या भाजपवाल्यांना आल्याचं त्यांच्या चालण्याबोलण्यातून दिसतोय..

 

मागच्या पाच सहा महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या काही महाशयांनी अशीच गरिबांची थट्टा उडवली होती...त्यात याच महानगरात वावरलेलं बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं असा मुर्ख दावा केला होता...त्यावेळी हेच भाजप नेते राज बब्बर यांच्यावर तुटून पडले होते.. आता दिवस बदललेत, सत्तेत भाजप आहे आणि विरोधात काँग्रेस पण गरिबांची थट्टा करायचं काही थांबलेलं नाही...50 रुपये कमावणारा गरिब नाही असा दावाही करणारे सरकारच...आणि पाच 10 रुपयात पोटभर जेवण मिळतं सांगणारेही आमच्याच देशातले नेते...या नेत्यांनी कधी आपल्या आलिशान गाडीतून खाली उतरून स्वतःच्या पैशानं कमी पैशांत जेवण केलय का....हा प्रकार जसा सत्तेचा माज दाखवतो तसच या नेत्यांना वस्तूस्थितीचं किती अज्ञान आहे हेही यातून दिसतंय..    

 

आशिष शेलार काय राज बब्बर काय..पक्ष कोणताही असो गरिबी आणि गरिबांचा कळवळा यांना किती आहे हे सांगण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न असतो...ज्या भाजपच्या आशिष शेलार यांनी पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं असं म्हटलय..त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी गरिब चहावाला देशाचा पंतप्रधान झाला म्हणून केवढी स्तुती झाली...पण त्यांना गरिबांचा किती कळवळा आहे हे सत्तेत आल्यानंतर एका महिन्यातच वाढलेल्या महागाईच्या आलेखानं दिसलय...महागाई का वाढली याचं लंगडं समर्थन आता हे भाजपचे नेते करत आहेत...सत्ता मिळवण्यासाठी फक्त थापा मारण्याचा धंदा या नेत्यांनी सुरू केलाय..

 

पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणून भाजपचे हेच नेते टीका करण्यात आघाडीवर होते..आशिष शेलार, विनोद तावडे यांनी मागच्या काही वर्षात अजित पवार, आर आर पाटील यांच्यावर कशी टीका केलीय ते आठवून पाहा...राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणणा-या भाजपची केंद्रात सत्ता येऊन अवघा महिना झालाय, अजून महाराष्ट्रात सत्ता आलेली नाही तर यांचं विमान हवेत उडायला लागलय..पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यावर तर माज येणारच पण यांना तर एका महिन्यात माज आलाय हे शेलारांच्या बोलण्यातून दिसतय...

शेलारसाहेब, तुम्ही मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहात ..सार्वजनिक जीवनात बोलताना काही तारतम्य बाळागयचं असतं हे तुम्हाला माहिती नाही असं कसं म्हणता येईलं...बोलताना कधी कधी नेत्यांचा तोल सुटतो..पण एवढा तोल सोडू नका की त्यातून गरिबांची आणि गरिबीची थट्टा करावी...हे तुम्हाला शोभत नाही एवढचं ...



  

 

Wednesday, April 9, 2014

राज ठाकरेंचं चाललय तरी काय ?

 
 
 
लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार का नाही याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली पण मोजक्याच जागांवर उमेदवार उभे करून त्यांना काय साध्य करायचंय हे स्पष्ट झालेलंच आहे. शिवसेना हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे हे राज ठाकरे यांनी जाहीरच केलय. केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडण्याच्या एकमेव उद्देशानं राज ठाकरे यांनी 10 उमेदवार दिलेत. त्यातला अपवाद फक्त पुणे आणि भिवंडी..या दोन ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचे उमेदवार आहेत. नरेंद्र मोदींबरोबरची मैत्री जाहीरपणे मान्य करायची, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्याचवेळी महायुतीतल्याच शिवसेनाला कट्टर विरोध करायचा हेच धोरण राज ठाकरेंनी अवलंबलय.
राज विरुद्ध उद्धव ठाकरे
मनसेला महायुतीत घेण्याचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण त्याला शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरेंनी विरोध केला. टाळीसाठी उद्धव ठाकरेंनी हात पुढं केला होता पण तेही फारसे गंभीर नव्हते. त्याला राज यांनी प्रतिसाद दिला नाही तो भाग वेगळा. दोन ठाकरे बंधूमधल्या तीव्र विरोधामुळे अखेर मनसेला महायुतीत जागा काही मिळाली नाही. त्यातच उद्दव ठाकरे यांनाच मनसे महायुतीत नको आहे असं सांगून भाजप नेत्यांनी आगीत तेल ओतलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाला विरोध करण्यासाठी 10 उमेदवार उतरून राजकारण केलय..
मनसेचा फायदा कोणाला ?
राज ठाकरे महायुतीत जाणार का याची चर्चा दोन वर्षापासून सुरु होती. त्यातच शिवसेना आणि मनसेच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनीही महायुतीत मनसे असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण ते शक्य झालं नाही..मुळात राज ठाकरे यांचा काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर आहे असं बोललं जात होतं. मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असचं दिसलं. मनसेमुळे मुंबई आणि आसपासच्या अनेक जागांवर भाजप शिवसेनेला फटका बसला आणि त्याचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आता मात्र मनसेच्या राजकीय खेळीचा आघाडीबरोबरच भाजपलाही फायदा होणार आहे.
 
मनसेचं टार्गेट फक्त शिवसेना
लोकसभेच्या यावर्षीच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट केलंय. पण मागच्या काही सभांमधून ते ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करत होते. तशी टीका त्यांनी केलेली नाही. अगदी काँग्रेसवरही फारच सौम्य टीका केलीय. अजित पवार आणि आर. आर. तर राज ठाकरेंचं खास गि-हाईकच, पण ते यावेळी होताना दिसत नाही. त्यातच शरद पवारांनी राज ठाकरेंची स्तुती केलीय. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड वेगळीच जमवाजमव झाल्याचं दिसतय. राज ठाकरे यांचा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेनाला प्रखर विरोध..राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सभांतून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. तर भाजपचं आतून राज ठाकरे प्रेम हे सर्वश्रुत झालय. त्यामुळे महाराष्ट्रात तरी शिवसेनाला टार्गेट करण्यावर सर्व पक्षांनी भर दिलाय.
नवे राजकीय समिकरण!
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राज ठाकरे आणि भाजप यांच्यात काही राजकीय बेरीज झाली तर नवल वाटायला नको. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो तसा शत्रूही नसतो...
  
 
 
 
 
 

Thursday, June 13, 2013

अडवाणींसाठी ‘ जय श्रीराम’ म्हणण्याची योग्य वेळ !!!


भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन तो परत घेण्याचा मुद्दा या आठवड्यात चांगलाच गाजला..पण मुळात अडवाणींनी हे राजीनामानाट्य केलंच का ? हा प्रश्न आता चर्चेचा बनलाय. लालकृष्ण अडवाणींवर ही वेळच का यावी हा पहिला प्रश्न..? दुसरं त्यांनी राजीनामा दिलाच होता तर परत का घेतला..? आणि यातून त्यांनी काय साध्य केलं.. ? यासारखे अनेक प्रश्न आहेत. ज्या अडवाणींनी भाजपच्या जन्मापासून त्या तो पक्ष सत्तेत आणण्यापर्यंत महत्वाची मजल मारली..ज्यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जातो त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली हेच अडवाणीचा मोठा पराभव आहे..

 


भाजपमध्ये सध्या दुस-या फळीतील नेत्यांच्या महत्वकांक्षा फारच वाढलेल्या आहेत. राजनाथ, जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, आणि इतर समवयीन नेते यांचा गट आता अडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फारसा जुमानत नाही..या सर्वांवर कडी केलीय ती नरेंद्र मोदींनी..मोदींना आता दिल्लीचं तख्त खुनावतय..गुजरातमध्ये भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप आता समिकरण झालय. गुजरात हा फक्त माझ्याच नावानं चालतो ही हुकुमशाहीवृत्ती त्यांच्यात बळावलीय..गुजरातचा विकास झाला वगैरे ठीक आहे पण ज्या पद्धतीनं त्यांनी गुजरातमध्ये भाजप पक्ष दावणीला बांधलाय..तोच कित्ता ते आता दिल्लीत गिरवु पाहता आहेत..

भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनच त्यांची वाटचाल सुरु झालीय..तसे फासे टाकण्यास मोदींच्या समर्थकांनी सुरुवात केलीय. त्याचाच पहिला अंक म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुख पदाची धुरा मोदींनी आपल्या गळ्यात पाडून घेतीलय..अलिकडं मोदींचं पक्षातलं वाढलेलं प्रस्थ हे दिल्लीतल्या नेत्यांना पचणारं नाही.,आजपर्यंत मोदींना अभय देणा-या अडवाणींनाही ते पचनी पडत नाही कारण स्पष्ट आहे..सध्या मोदींची हवा जोरात आहे..आणि हीच अडवाणींना न पटणारी गोष्ट आहे..जोपर्यंत मोदींचा वावर गुजरातपुरता मर्यादीत होता तोपर्यंत त्यांना अडवाणीचं अभय होतं. पण त्याच मोदींचं नाव पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर घेतलं जाऊ लागलं इथचं माशी शिंकली....आणि अडवाणींचा मोदी विरोध वाढला...

नरेंद्र मोदींची निवड ही अडवाणींना नको होती तरीही त्यांचा विरोध डावलून राजनाथसिंहांनी मोदींची नियुक्ती केलीच हा अडवाणींना पहिला धक्का दुसरा धक्का पक्षातले निर्णय आता आपल्याला न विचारताच घेतले जात आहेत हा आहे. यातून त्यांनी राजीनामे दिले..पण त्यावरही ते ठाम राहीले नाहीत..24 तासातच त्यांनी ते मागेही घेतले..काही नेत्यांनी त्यांची मनधरणी केली असं म्हणतात..त्यातच संघानही अडवाणींना सुनावलं...नव्या पिढीला मार्गदर्शन करा असा संदेश नागपुरातून देण्यात आला..राजनाथसिंह यांनाही मोदींचा निर्णय मागे घेणार नाही असं स्पष्ट केलं..शेवटी मोदी आणि कंपू जिंकला आणि अडवाणी हरले...

अडवाणींची पंतप्रधानपदाची इच्छा काही लपून राहीलेली नाही..2009 मध्ये त्यांच्या नावावर भाजपनं फासे टाकून पाहिले पण तोंडघशी पडले..आता 2014 साठी मोदींचं नाव पुढं केलं जात आहे म्हणजे सत्ता स्थापन्याची वेळ आलीच तर आपला पत्ता लागेल का नाही याची चिंता अडवाणींना सतावतेय...ज्या पक्षात वाजपेयी सक्रीय होते तेव्हाही अडवणींचा शब्द प्रमाण मानला जायचा त्याच भाजपात अडवाणींच्या डोळ्यादेखत नवी पिढी त्यांना डावलतेय याचं शल्यही त्यांना डाचत असावं. त्यांची अवस्था आता महाभारतातल्या पितामह भिष्मासारखी झालीय..सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर घडतय आणि ते काहीच करु शकत नाहीत...

अडवाणींनी राजीनामे परत न घेता सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय कायम ठेवला असता तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती. पण त्यांनी तेही केलं नाही...राजीनामे परत घेतल्यानं त्यांची उरली सुरली पतही राहिली नाही.. ज्या पक्षात आपल्याला आता किंमत राहिलेली नाही म्हणून त्यांनी राजीनामे दिले ते त्यांनी परत घेतलेच का...? कारण ब्लॅकमेलिंग म्हणावं तर त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही उलट मोदी आणि इतरांना जे हवं तेतर झालं. मग ही तीन दिवसांची पोटदुखी आणि 24 तासांचं राजीनामा नाट्य हा फार्स अडवाणींनी का केला..?.या सर्व प्रकरणानानंतर अडवाणींनी राजकारणाला जय श्रीराम केला असता तर त्यांची पत काहीतरी राहिली असती...