Thursday, February 26, 2015

युतीच्या वादाचा 'सामना'

“सत्तेत राहूनही सहकारी भाजपला टोले मारण्याची एकही संधी सध्या शिवसेना सोडत नाही.आजच्या टीकेसाठी निमित्त होतं, पानसरेंच्या हत्येचं... ही टीकाही थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध आहे..सत्तेत राहून अशी टीका करणं किती संयुक्तिक आहे असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण होतो”महाराष्ट्रात युतीचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेयत...पण युतीचा गाडा मात्र सरळ चाललेला दिसत नाही. शिवसेना भाजपवर टीका करण्यासाठी मुद्द्यांच्याच शोधात आहे की काय अशी शंका आता निर्माण होतंय...रोज नवा मुद्दा आणि नवी टीका असं समीकरणच सध्या बनून गेलंय..यावेळचा मुद्दा आहे तो गोविंद पानसरेंच्या हत्येचा...सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय...”जे दाभोळकर प्रकरणात झाले तेच पानसरेंप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदललेले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू आहे. पानसरे हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 20 टीम स्थापन केल्यात. दाभोळकरांच्या वेळीही अशा 'टीम'स्थापन झाल्याच होत्या. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे ? कोणी सांगेल काय?” अशी टीका करण्यात आलीय...ही टीका नक्कीच बोचणारी आहे..सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणा-या मित्रानं अशी टीका केल्यामुळं ती भाजपवाल्यांच्या डोक्यात जाणार यात शंका नाही... आणि झालंही तसंच...मुख्यमंत्र्यांनी सामंजस्यानं प्रत्युत्तर दिलं असलं तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी ठोशास ठोसा लगावला.‘सामाना’तून होणा-या टीकेचा एकदाच सोक्षमोक्ष लावण्याचा दानवेंनी इशारा दिलाय.भाजपनं युती सरकारमध्ये शिवसेनेला सामावून घेण्यासाठी खूपच ताणून धरलं होतं. त्याचा राग शिवसेनेच्या मनात खदखदत असणारच...पण किती काळ हा राग मनात ठेवणार ?...आता शिवसेनासुद्धा याच युती सरकारचा घटकपक्ष आहे...त्यामुळं सरकारचं अपयश म्हणजे एकट्या भाजपचं अपयश असं शिवसेना कसं काय मानते ? स्वतःच्याच सरकारवर एवढी टीका करण्याची शिवसेनेला खुमखुमी असेल तर भाजप म्हणते त्याप्रमाणे शिवसेना सरकारमधून बाहेर का पडत नाही ? शिवसेनेला अजूनही सत्तेत असल्याची जाणीवच होत नाही का ? सत्तेत राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि अपयशाचं खापर मात्र भाजपवर फोडायचं अशी भूमिका असेल तर शिवसेनेची ती राजकीयदृष्ट्या अपरिपक्वता असेल आणि त्याचा फटका शिवसेनेलाच बसेल हे शिवसेना लक्षात का घेत नाही..शिवसेनेनं वेळीच सरकारमध्ये असल्याचं भान ठेवावं आणि चांगला कारभार करुन छाप पाडावी. बाकी टीका करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक, राजकीय आखाडा आहेच की...या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार १५ वर्ष सत्तेत होतं. त्यांच्यातही सर्वकाही काही आलबेल होतं असं नाही.त्यांच्यातही विस्तव जात नव्हता. पण त्यांच्या एवढ्या कुरबुरी नव्हत्या. ज्या होत्या त्या मंत्रालयाच्या मजल्यावरच व्हायच्या.कधी कधी ही धुसफूस बाहेर पडायची पण त्यासाठी त्यांना खूप वेळ लागला. सुरवातीला त्यांनी ही धुसफूस बाहेर येणार नाही याचीकाळजी घेतली जात होती.विलासराव असो वा सुशिलकुमार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ब-यापैकी जुळवून घेतलं होतं. त्यांच्यातले वाद वाढले ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर तेही शेवटच्या २-३ वर्षात..पण शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये तर पहिल्या दोन तीन महिन्यातच कुरुबुरीला जाहीर स्वरुप आलय..हे शिवसेनेनं थांबवलं तर त्यात त्यांचचं भलं आहे....  

Saturday, February 21, 2015

कुठं आहे पुरोगामी महाराष्ट्र?

“महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य. महाराष्ट्राएवढा पुरोगामी विचार देशात कोणत्याही राज्यात रुजला नाही पण याच राज्यात प्रतिगामी शक्तीही तेवढ्याच वाढल्यात नव्हे फोफावल्यात...दाभोळकरांची हत्या असो वा पानसरेंची...यातून या प्रतिगामी शक्ती डोकं वर काढत असल्याचंच दिसतय..ज्या राज्यात पुरोगामी विचाराचा मोठा लढा उभारला त्याच राज्यात प्रतिगामी शक्ती का वाढाव्यात.”

Thursday, February 12, 2015

तेरा 'झाडू' चल गया

भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना शह देतअरविंद केजरीवाल यांनीराजधानीतून देशाच्या राजकारणात नवा इतिहास लिहिलाय.सरकारमधील उच्चपदाची नोकरी सोडून सामाजिक प्रश्नावर लढण्यासाठी  अण्णा हजारेंचाय आंदोलनात उडी घेतली. नंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून थेट राजकारणात उडी घेतली आणि दोन वर्षात दुस-यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत थक्क करणारी मजल मारलीय.. लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडगोळीचा उधळलेला विजयाचा रथ अखेर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी अडवला. हा विजयरथ नुसता अडवलाच नाही तर 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकून त्यांनी भाजप आणि काँग्रेसला एवढी मोठी धोबीपछाड दिली की त्यांना या पराभवाचं आणि केजरीवाल यांच्या विजयाचं हजारदा चिंतन करावं लागणाराय. विशेषतः भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत मोदी-शहांनी जो विजयाचा धडाका लावला होता. त्यामुळे काँग्रेससह छोट्या प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले होते. पण अरविंद केजरीवालांचा ‘झाडू’दिल्लीत असा काही चालला की भाजप फक्त तीन जागांवर येऊन थांबाला. काँग्रेसचा तर विचार न केलेलाच बरा. त्यांच्या 61 उमेदवारांना अनामतही वाचवता आली नाही.. दोन वर्षांआधी म्हणजे 2013 ला आम आदमी पक्षानं राजकारणातली पहिली परीक्षा दिली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि भाजपला मागं टाकलं. बहुमतासाठी काही जागा त्यांना कमी पडल्या होत्या, तरिही त्यांनी सत्ता स्थापन केली. पण अवघ्या 49 दिवसांतच केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदासह सत्ताही सोडली. तेंव्हापासून केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत होती, पळपुटा माणूस, अराजक निर्माण करणारा नेता, नेहमी नेहमी धरणं धरणारा माणुस म्हणून केजरीवालांची थट्टा केली जात होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानीपत झालं आणि मोदींच्यारुपानं नवी शक्ती दिल्लीच्या राजकारणात उदयाला आली.काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांनाही मोदींच्या भाजपनं धोबी पछाड दिली. यशाचा हा वारू उधळतच होता. त्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मोदींचा वारू असाच उधळेल असा अंदाज होता. पण केजरीवाल यांनी झाल्या चुका जाहीरपणे मान्य करून लोकांना पुन्हा एकदा सत्ता देण्याचं आवाहन केलं. केजरीवाल यांचा हाच प्रामाणिकपणा त्यांच्या कामी आला आणि दिल्लीकरांनी प्रचंड, प्रचंड अतिप्रचंड असा कौल दिला.. भाजपनं दिल्लीच्या निवडणुकीसाठी मोठा फौजफाटा उतरवला. छोट्याशा दिल्लीसाठी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्ते प्रचारात उतरवले. किरण बेदींना आयत्यावेळी भाजपात घेऊन थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनच मैदानात उतरवलं.बाहेरून आणलेली कमुक, बाहेरून आणलेले उमेदवार आणि मोदी, शहांच्या हुकुमशाही नेतृत्वाला दिल्लीकरांनी अजिबात थारा दिला नाही.पंतप्रधान मोदींच्या विकासाचा बुरखाही दिल्लीकरांनी टराटरा फाडला. हा निकाल भाजपसाठी बरचंकाही सांगणारा आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका, घरवापसी, चार-पाच मुलांना जन्म देण्याचा अनाहुत सल्ला देणारे हिंदू परिवारातले नेते यामुळं जनतेत नाराजी वाढलीच होती. त्यातच मोदींचा सारखा-सारखा वाजणारा विकासाचा पोकळ ढोलही लोकांना आवडला नाही असचं दिसतय. त्याविरोधात केजरीवालांचा प्रामाणिकपणा लोकांना आवडला. केजरीवालांच्या या यशात अनेक राजकीय पक्षांना आशेचा किरणही दिसू लागलाय. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना असो वा मोदींशी थेट दोन हात करणा-या ममता बॅनर्जी, नितीशकुमार, डावे पक्ष यांना दिल्लीतला विजय हा आपलाच विजय असल्याचं वाटू लागलय. कारण मोदींचा विजयरथ थोपवण्याचं धाडस कोणीही करु शकलं नव्हतं. उधळलेला हा घोडा केजरीवालांनी अडवल्यानं आपणही या मोदी लाटेचा वारू थोपवू शकतो असं या पक्षांना आता वाटू लागलय. त्यामुळचं केजरीवालांवर या पक्षांनी लगेच शुभेच्छांचा वर्षाव केला.दिल्लीच्या विजयानं पुन्हा एकदा नवी राजकीय समिकरणं उदयाला येतील हे मात्र नक्की.    

तेरा 'झाडू' चल गया

भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना शह देतअरविंद केजरीवाल यांनीराजधानीतून देशाच्या राजकारणात नवा इतिहास लिहिलाय.सरकारमधील उच्चपदाची नोकरी सोडून सामाजिक प्रश्नावर लढण्यासाठी  अण्णा हजारेंचाय आंदोलनात उडी घेतली. नंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून थेट राजकारणात उडी घेतली आणि दोन वर्षात दुस-यांदा दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत थक्क करणारी मजल मारलीय.. लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडगोळीचा उधळलेला विजयाचा रथ अखेर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी अडवला. हा विजयरथ नुसता अडवलाच नाही तर 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकून त्यांनी भाजप आणि काँग्रेसला एवढी मोठी धोबीपछाड दिली की त्यांना या पराभवाचं आणि केजरीवाल यांच्या विजयाचं हजारदा चिंतन करावं लागणाराय. विशेषतः भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत मोदी-शहांनी जो विजयाचा धडाका लावला होता. त्यामुळे काँग्रेससह छोट्या प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले होते. पण अरविंद केजरीवालांचा ‘झाडू’दिल्लीत असा काही चालला की भाजप फक्त तीन जागांवर येऊन थांबाला. काँग्रेसचा तर विचार न केलेलाच बरा. त्यांच्या 61 उमेदवारांना अनामतही वाचवता आली नाही.. दोन वर्षांआधी म्हणजे 2013 ला आम आदमी पक्षानं राजकारणातली पहिली परीक्षा दिली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि भाजपला मागं टाकलं. बहुमतासाठी काही जागा त्यांना कमी पडल्या होत्या, तरिही त्यांनी सत्ता स्थापन केली. पण अवघ्या 49 दिवसांतच केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदासह सत्ताही सोडली. तेंव्हापासून केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका होत होती, पळपुटा माणूस, अराजक निर्माण करणारा नेता, नेहमी नेहमी धरणं धरणारा माणुस म्हणून केजरीवालांची थट्टा केली जात होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानीपत झालं आणि मोदींच्यारुपानं नवी शक्ती दिल्लीच्या राजकारणात उदयाला आली.काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांनाही मोदींच्या भाजपनं धोबी पछाड दिली. यशाचा हा वारू उधळतच होता. त्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मोदींचा वारू असाच उधळेल असा अंदाज होता. पण केजरीवाल यांनी झाल्या चुका जाहीरपणे मान्य करून लोकांना पुन्हा एकदा सत्ता देण्याचं आवाहन केलं. केजरीवाल यांचा हाच प्रामाणिकपणा त्यांच्या कामी आला आणि दिल्लीकरांनी प्रचंड, प्रचंड अतिप्रचंड असा कौल दिला.. भाजपनं दिल्लीच्या निवडणुकीसाठी मोठा फौजफाटा उतरवला. छोट्याशा दिल्लीसाठी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह हजारो कार्यकर्ते प्रचारात उतरवले. किरण बेदींना आयत्यावेळी भाजपात घेऊन थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनच मैदानात उतरवलं.बाहेरून आणलेली कमुक, बाहेरून आणलेले उमेदवार आणि मोदी, शहांच्या हुकुमशाही नेतृत्वाला दिल्लीकरांनी अजिबात थारा दिला नाही.पंतप्रधान मोदींच्या विकासाचा बुरखाही दिल्लीकरांनी टराटरा फाडला. हा निकाल भाजपसाठी बरचंकाही सांगणारा आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून हिंदूत्ववादी संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका, घरवापसी, चार-पाच मुलांना जन्म देण्याचा अनाहुत सल्ला देणारे हिंदू परिवारातले नेते यामुळं जनतेत नाराजी वाढलीच होती. त्यातच मोदींचा सारखा-सारखा वाजणारा विकासाचा पोकळ ढोलही लोकांना आवडला नाही असचं दिसतय. त्याविरोधात केजरीवालांचा प्रामाणिकपणा लोकांना आवडला. केजरीवालांच्या या यशात अनेक राजकीय पक्षांना आशेचा किरणही दिसू लागलाय. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना असो वा मोदींशी थेट दोन हात करणा-या ममता बॅनर्जी, नितीशकुमार, डावे पक्ष यांना दिल्लीतला विजय हा आपलाच विजय असल्याचं वाटू लागलय. कारण मोदींचा विजयरथ थोपवण्याचं धाडस कोणीही करु शकलं नव्हतं. उधळलेला हा घोडा केजरीवालांनी अडवल्यानं आपणही या मोदी लाटेचा वारू थोपवू शकतो असं या पक्षांना आता वाटू लागलय. त्यामुळचं केजरीवालांवर या पक्षांनी लगेच शुभेच्छांचा वर्षाव केला.दिल्लीच्या विजयानं पुन्हा एकदा नवी राजकीय समिकरणं उदयाला येतील हे मात्र नक्की.    

Saturday, February 7, 2015

भारत पुन्हा चमत्कार करेल

क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या वर्ल्डकपचा थरार आता लवकरच सुरू होतोय. दोनदा विश्वविजेतेपदावर नाव कोरणारा आणि  टी-20 चा वर्ल्डकप जिंकणारा भारत आता पुन्हा एकदा धोनीच्या नेत्त्वाखाली मैदानात उतरत आहे. पण यंदाची मोहीम टीम इंडियासाठी काही सोप्पी नाही..अननुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीयांची यंदा कसोटी लागणार आहे..14 फेब्रुवारीपासून क्रिकेट विश्वातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. विजेतेपदासाठी यंदाचा फेवरेट संघ कोण असणार याची अटकळ आतापासूनच लावली जातेय. गेल्या विश्वविजयाची पुनरावृत्ती भारत करणार का याची उत्कंठा शिगेला पोचलीय..भारत करेल चमत्कार ?भारत माजी विजेता असला तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधला भारताचा इतिहास काही चांगला नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेत भारत फायनलही गाठू शकला नाही. स्पिनर्सचा वरचष्मा असणा-या मैदानांवर भारत नेहमीच वरचष्मा गाजवत आलाय. पण ऑस्ट्रेलियन उपखंडातील मैदानं ही जलदगती गोलंदाजांना अनुकूल असतात. या मैदानावर भारतीयांना सावधपणे फलंदाजी करावी लागणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आलाय. जर भारतानं वर्ल्ड कपची फायनल गाठली तर ते 144 दिवस कुटुंबापासून दूर राहतील. सतत मॅच खेळण्याचं दडपण आणि कुटुंबापासून दूर राहण्याचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर दिसू शकतो.अनुभवी खेळाडूंची कमतरता2011 चा वर्ल्ड कप जिंकणा-या भारतीय संघातील बरेच खेळाडू यंदा नाहीत. सचिन तेंडूलकर, मॅच विनर युवराजसिंह हे या वर्ल्डकपमध्ये नाहीत. या दोघांसह अनेक अनुभवी खेळाडू यावेळी नाहीत. धोनीला या खेळाडूंची उणीव निश्चितपणे जाणवणार आहे. अननुभवी खेळाडूंना त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आव्हान धोनीसमोर असणार आहे. यंदा भारताचा सर्वात फेवरीट खेळाडू असणार आहे तो विराट कोहली. कोहलीच्या कामगिरीवर भारतीय संघाचं बरंचसं यश अपयश अवलंबून असणार आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांची चांगली सुरूवात भारताला विजयाची पायाभरणी करून देऊ शकते. सुरैश रैना, रविंद्र जाडेजा, धोनी यांची मधल्या फळीतली कामगिरी संघाचं पारडं जड करू शकते.गोलंदाजी ठरणार डोकेदुखी ?गोलंदाजी ही भारतासमोरची प्रमुख समस्या आहे. अनुभवी जलदगती गोलंदाज नसल्यानं प्रमुख भिस्त इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी यांनाच वाहावी लागणार आहे. पण लढण्याआधीच इशांत शर्मा फिटनेसमध्ये फेल झालाय. त्यामुळं भारताकडे गोलंदाजीचा अभाव दिसतोय. मधल्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचं आव्हान स्पिनर्सना उचलावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या वातावरणात भारतीय गोलंदाज कसा टिकाव धरणार हे पाहावं लागेल...फलंदाजांचीही बाजू फारशी भक्कम दिसत नाही. धोनीही आता एवढा फॉर्ममध्ये नाही..त्यामुळं कोहली, रैना, रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर वर्ल्डकप जिंकणं हे मोठं आव्हान आहे. सर्व समस्यांचा सामना करत भारतीय संघ फायनलपर्यंत तरी आव्हान टिकवून ठेवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणाराय..अशा परिस्थिती टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड कप जिंकेल अशी आपण फक्त आशाच करू शकतो...त्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा देऊयात...

Tuesday, February 3, 2015

सर्वशक्तिमान मुख्यमंत्री फडणवीस!

राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत..अशातच सरकारमध्ये शक्तिमान कोण यावरून वाद रंगलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शक्तिमान मुख्यमंत्री आहे असं म्हटलय...त्यांनी हा इशारावजा संदेश कोणा-कोणाला उद्देशून दिलाय.”​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच आशिर्वाद असल्यानं ते सध्यातरी सर्वशक्तीमान मुख्यमंत्री असल्याचं सांगत आहेत.. भाजपमधल्या सर्व श्रेष्ठांना आणि ज्येष्ठांना डावलून फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यानं एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांचा भ्रमनिराश झाला..पण थेट मोदी-शहांचाच वरदहस्त असल्यानं आवाज करण्याची कोणाचाही हिम्मत झाली नाही..आत्ताही एकनाथ खडसे कधी जाहीरपणे तरी कधी पडद्याआड त्यांची नाराजी व्यक्त करतातच. पण भाजपचे इतर नेत्यांची अवस्था मात्र तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार अशीच झालीय. ते बिचारे उघडपणे त्यांची नाराजीही व्यक्त करू शकत नाहीत..पक्षांतर्गत हा विरोध असताना दुस-या बाजूला शिवसेनेचाही मोठा विरोध फडणवीस यांना पत्करावा लागतोय..अशात फडणवीस यांनी मात्र मी शक्तीमान मुख्यमंत्री आहे असे संकेत आणि इशारा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना हा संदेश दिलाय.त्यांचा हा संदेश काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जसा आहे तसाच तो गल्लीत म्हणजे मातोश्रीवर निर्णय घेत नाही असा सुचक इशारा उद्दव ठाकरेंनाही आहेच...तर दिल्लीत निर्णय घेत नाही याचा अर्थ पंतप्रधान मोदी, अमित शहा किंवा नितीन गडकरींनाही विचारून निर्णय घेत नाही असचं त्यांना सुचवाचय...शिवसेना हा भाजप सरकारचा सहकारी पक्ष असला तरी निर्णय प्रक्रियेचे सर्वाधिकार आपल्याच हाती आहेत. त्यामध्ये शिवसेनेचेचा अडथळा असणार नाही असा स्पष्ट संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलाय...​​​राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत. असं असताना मुख्यमंत्र्यांनी असा इशारा देण्यामागं काही कारणंही आहेत. आधी युती तोडून भाजपनं शिवसेनेला एकटं पाडलं होतं. त्यानंतर सत्तेत सहभागी करुन घेण्यासाठी शिवसेनेला जागा दाखवून दिली..कधी नव्हे एवढा पाणउतारा भाजपनं शिवसेनेचा केला. त्याची मोठी सल शिवसेनेच्या मनात आहेच. त्यामुळंच जेंव्हा जेंव्हा संधी मिळेत तेव्हा शिवसेना भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची संधी सोडत नाही. हा सामना रंगतच जाणाराय. सत्तेत राहुनही शिवसेना भाजपला वेळीवेळी विरोध करण्याची संधी सोडत नाही. आताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या कायदा सुवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती..गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे..त्यातच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या खून झाला..हा धागा पकडत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेरच दिलाय..उद्धव ठाकरे फक्त कायदा सुव्यवस्थेवरच चिंता करुनच थांबले नाहीत तर उसाच्या प्रश्नावरही त्यांनी वेगळी भूमिका मांडली.. शिवसेना शेतक-यांच्या पाठीशीच आहे. सत्तेत असलो तरीही आणि सत्तेत नसलो तरीही असं म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची पाठराखणही केली. एकीकडे शेतक-यांची सहानुभूती मिळवायची, दुसरीकडं भाजपकडे झुकलेल्या मित्रपक्षांना पाठिंबा द्यायचा आणि थेट सरकारवर हल्ला करायचा अशी नितीच शिवसेनेनं आखल्याचं दिसतय. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती आहे. म्हणूनच त्यांनाही परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्वांना सूचक इशारा दिलाय. त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. ते जरी मीच सर्वशक्तीमान असल्याचं सांगत असले तरी त्यांना सरकार चालवणं एवढं सोपं नाही. शिवसेनेला जरी त्यांनी इशारा दिला असला तरी शिवसेनाही काही गप्प बसणार नाही..संधी मिळेत तेव्हा शिवसेना मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यास कमी करणार नाही...मुख्यमंत्र्यांना पक्षांतर्गत विरोधकही काही कमी नाहीत..एकनाथ खडसे, मुनगंटीवार,विनोद तावडे हे शांत बसून मुख्यमंत्र्यांना काम करु देतील असं वाटत नाही....

Sunday, February 1, 2015

पराभवातून राज ठाकरे कसे सावरणार...

मनसेच्या गडाला खिंडार
 .... घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हंटलं जातं...त्याची प्रचिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या येतेय...लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं पक्षात निराशेचं वातावरण आहे...म्हणूनच की काय मनसेच्या तीन आघाडीच्या विकेट्स पडल्या....राज ठाकरेंचे निष्ठावान त्यांना का सोडून गेले जातात त्याचा आता त्यांनी विचार करायला हवा..   विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भातखळकरांनीमनसेत प्रवेश घेण्याची विनंती करुनही त्यांना मनसेत का घेतलंनाही हे राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. आपण भाजपच्या नेत्यांना मनसेत घेत नाही पण मनसेचे नेत्यांना भाजप का घेतंय असा सवालच त्यांनी यातून विचारला होता..त्याला पार्श्वभूमी होती राज यांचे एक शिलेदार घाटकोपरचे राम कदम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली याची....पण राज यांच्या भाजपच्या सॉफ्ट कॉर्नरचा भाजपवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही...भाजपानं राज ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाच..प्रवीण दरेकर,नाशिकचे वसंत गिते आणि कल्याणचे रमेश पाटील या तिन्ही माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्यात आला..राजकीय निर्णय घेण्याच्या राज यांच्या धरसोड वृत्तीमुळंच पराभव झाल्याची या सर्वांची भावना होती. पराभवानंतरही पक्ष जोमानं कामाला लागलेला दिसत नसल्यामुळं त्यांच्या नैराश्यात अधिकच भर पडली. या नैराश्यातून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि शेवटी त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला... निष्ठावानांनी सोडली साथप्रवीण दरेकर हे राज ठाकरे यांचे शिवसेनेपासूनचे निष्ठावान समर्थक..पण त्यांनीही राज ठाकरेंची साथ सोडली.दरेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावान आणि खंदे समर्थक असले तरी मागच्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा दरेकर यांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप वाढला होता. प्रचारसभेतच राज ठाकरेंनी दरेकरांची व्होट बँक असलेल्या उत्तर भारतीय आणि झोपडपट्टीच्या विरोधात भूमिका घेतली..त्यानंतर पराभवाचं खापर उमेदवारांवरच फोडल्यानंतर नाराज झालेल्या दरेकांनी दिलेला राजीनामा राज यांनी स्विकारला..तसच राज यांची सुरक्षा राज्य सरकारनं कमी केल्यानंतर दरेकरांनी दिलेली सुरक्षा जीपही राज यांनी परत केली..हे दरेकर यांच्या जिव्हारी लागलं..त्यातच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचे वाढतं वर्चस्व आणि कृष्णकुंकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळू लागल्यानं दरेकर यांनी अखेर राजनिष्ठेचा झेंडा खाली ठेवला...दरेकरांसारखेच नाशिकमध्ये मनसेचा गड भक्कम करण्यात ज्या वसंत गीतेंनी जीवाचं रान केलं त्यांनाही मागच्या काही महिन्यांपासून डावललं जात होतं. नाशिकमधले पक्षाचे महत्वाचे निर्णय गीते नाहीतर अविनाश अभ्यंकर घेत होते. राज यांनी वसंत गीतेंना डावलून अभ्यंकरावंर जबाबदारी दिली. नाशिकचा महापौर निवडण्यातही वसंत गीते यांना विचारत घेतलं नाही. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असतानाही कुंभमेळ्याच्या निधी आणि विकासकामात गीतेंना डावलण्यात आलं..वसंत गीते नाराजी असताना नाशिकमध्ये येऊनही राज ठाकरेंनी गीतेंची दखल घेतली नाही. त्यातूनच वसंत गीते यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. गीते यांनी मनसे सोडल्यानं नाशिकचा मनसेचा गड आता खिळखिळा झालाय..पुन्हा नाशिकमध्ये मनसेचं इंजिन रुळावर येईल हे अशक्यचं दिसतय... मुंबई आणि नाशिकनंतर मनसेला जिथं चांगला जनाधार आहे ते शहर म्हणजे कल्याण..याच कल्याणनं महापालिका आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलं. त्याच कल्याणचे आमदार रमेश पाटील यांनीही मनसेला रामराम ठोकत मोदी लाटेत उडी घेतली...रमेश पाटलांचा कल्याणमध्ये पक्षावर फारसा फरक पडेल असं नसलं तरी त्यांचा एक माजी आमदार सोडून का गेला त्याचा विचार करावा लागेलच..दरेकर आणि गिते हे दोघेही जनाधार असलेले नेते असल्यामुळं त्यांच्या जाण्यानं मनसेला नुकसान तर भाजपला फायदाच होणाराय. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दरेकर हे भाजपसाठी जमेची बाजू ठरतीलही.पण मनसेच्या तोटा मात्र नक्कीच होणाराय..असे एक एक निष्ठावान कार्यकर्ते सोडून जात असताना राज ठाकरे यांच्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही..मी म्हणजेच पक्ष अशा थाटात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीतूनराज यांनी काही धडा घेतला नाही तर मनसेचं फक्त इंजिनच शिल्लक राहिल... कारण बाळासाहेब ठाकरे यांना अनेक कट्टर समर्थक सोडून गेले तर शिवसेनेला काही फरक पडला नाही त्याचं कारण शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हाच सर्वात मोठी जमेची बाजू होती...पण बाळासाहेब हे बाळासाहेब  होते त्यांचे नेते नाही तर कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे त्यांच्यापाठीशी उभा होता. ही ताकद राज ठाकरे यांच्यामागे नाही..त्यामुळं एक एक शिलेदार सोडून जाणं ही राज यांच्यासाठी चिंतेची बाब आहे..किल्ल्याचा एक एक बुरूज ढासळू नये म्हणून राज ठाकरे आता काय करतात का त्यावरच मनसेचं भवितव्य अवलंबून आहे..