Saturday, February 7, 2015

भारत पुन्हा चमत्कार करेल

क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या वर्ल्डकपचा थरार आता लवकरच सुरू होतोय. दोनदा विश्वविजेतेपदावर नाव कोरणारा आणि  टी-20 चा वर्ल्डकप जिंकणारा भारत आता पुन्हा एकदा धोनीच्या नेत्त्वाखाली मैदानात उतरत आहे. पण यंदाची मोहीम टीम इंडियासाठी काही सोप्पी नाही..अननुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीयांची यंदा कसोटी लागणार आहे..14 फेब्रुवारीपासून क्रिकेट विश्वातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. विजेतेपदासाठी यंदाचा फेवरेट संघ कोण असणार याची अटकळ आतापासूनच लावली जातेय. गेल्या विश्वविजयाची पुनरावृत्ती भारत करणार का याची उत्कंठा शिगेला पोचलीय..भारत करेल चमत्कार ?भारत माजी विजेता असला तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधला भारताचा इतिहास काही चांगला नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेत भारत फायनलही गाठू शकला नाही. स्पिनर्सचा वरचष्मा असणा-या मैदानांवर भारत नेहमीच वरचष्मा गाजवत आलाय. पण ऑस्ट्रेलियन उपखंडातील मैदानं ही जलदगती गोलंदाजांना अनुकूल असतात. या मैदानावर भारतीयांना सावधपणे फलंदाजी करावी लागणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आलाय. जर भारतानं वर्ल्ड कपची फायनल गाठली तर ते 144 दिवस कुटुंबापासून दूर राहतील. सतत मॅच खेळण्याचं दडपण आणि कुटुंबापासून दूर राहण्याचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर दिसू शकतो.अनुभवी खेळाडूंची कमतरता2011 चा वर्ल्ड कप जिंकणा-या भारतीय संघातील बरेच खेळाडू यंदा नाहीत. सचिन तेंडूलकर, मॅच विनर युवराजसिंह हे या वर्ल्डकपमध्ये नाहीत. या दोघांसह अनेक अनुभवी खेळाडू यावेळी नाहीत. धोनीला या खेळाडूंची उणीव निश्चितपणे जाणवणार आहे. अननुभवी खेळाडूंना त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आव्हान धोनीसमोर असणार आहे. यंदा भारताचा सर्वात फेवरीट खेळाडू असणार आहे तो विराट कोहली. कोहलीच्या कामगिरीवर भारतीय संघाचं बरंचसं यश अपयश अवलंबून असणार आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांची चांगली सुरूवात भारताला विजयाची पायाभरणी करून देऊ शकते. सुरैश रैना, रविंद्र जाडेजा, धोनी यांची मधल्या फळीतली कामगिरी संघाचं पारडं जड करू शकते.गोलंदाजी ठरणार डोकेदुखी ?गोलंदाजी ही भारतासमोरची प्रमुख समस्या आहे. अनुभवी जलदगती गोलंदाज नसल्यानं प्रमुख भिस्त इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी यांनाच वाहावी लागणार आहे. पण लढण्याआधीच इशांत शर्मा फिटनेसमध्ये फेल झालाय. त्यामुळं भारताकडे गोलंदाजीचा अभाव दिसतोय. मधल्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचं आव्हान स्पिनर्सना उचलावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या वातावरणात भारतीय गोलंदाज कसा टिकाव धरणार हे पाहावं लागेल...फलंदाजांचीही बाजू फारशी भक्कम दिसत नाही. धोनीही आता एवढा फॉर्ममध्ये नाही..त्यामुळं कोहली, रैना, रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर वर्ल्डकप जिंकणं हे मोठं आव्हान आहे. सर्व समस्यांचा सामना करत भारतीय संघ फायनलपर्यंत तरी आव्हान टिकवून ठेवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणाराय..अशा परिस्थिती टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड कप जिंकेल अशी आपण फक्त आशाच करू शकतो...त्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा देऊयात...

No comments:

Post a Comment