Sunday, February 1, 2015

पराभवातून राज ठाकरे कसे सावरणार...

मनसेच्या गडाला खिंडार
 .... घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हंटलं जातं...त्याची प्रचिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या येतेय...लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं पक्षात निराशेचं वातावरण आहे...म्हणूनच की काय मनसेच्या तीन आघाडीच्या विकेट्स पडल्या....राज ठाकरेंचे निष्ठावान त्यांना का सोडून गेले जातात त्याचा आता त्यांनी विचार करायला हवा..   विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भातखळकरांनीमनसेत प्रवेश घेण्याची विनंती करुनही त्यांना मनसेत का घेतलंनाही हे राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. आपण भाजपच्या नेत्यांना मनसेत घेत नाही पण मनसेचे नेत्यांना भाजप का घेतंय असा सवालच त्यांनी यातून विचारला होता..त्याला पार्श्वभूमी होती राज यांचे एक शिलेदार घाटकोपरचे राम कदम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली याची....पण राज यांच्या भाजपच्या सॉफ्ट कॉर्नरचा भाजपवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही...भाजपानं राज ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाच..प्रवीण दरेकर,नाशिकचे वसंत गिते आणि कल्याणचे रमेश पाटील या तिन्ही माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्यात आला..राजकीय निर्णय घेण्याच्या राज यांच्या धरसोड वृत्तीमुळंच पराभव झाल्याची या सर्वांची भावना होती. पराभवानंतरही पक्ष जोमानं कामाला लागलेला दिसत नसल्यामुळं त्यांच्या नैराश्यात अधिकच भर पडली. या नैराश्यातून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि शेवटी त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला... निष्ठावानांनी सोडली साथप्रवीण दरेकर हे राज ठाकरे यांचे शिवसेनेपासूनचे निष्ठावान समर्थक..पण त्यांनीही राज ठाकरेंची साथ सोडली.दरेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावान आणि खंदे समर्थक असले तरी मागच्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा दरेकर यांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप वाढला होता. प्रचारसभेतच राज ठाकरेंनी दरेकरांची व्होट बँक असलेल्या उत्तर भारतीय आणि झोपडपट्टीच्या विरोधात भूमिका घेतली..त्यानंतर पराभवाचं खापर उमेदवारांवरच फोडल्यानंतर नाराज झालेल्या दरेकांनी दिलेला राजीनामा राज यांनी स्विकारला..तसच राज यांची सुरक्षा राज्य सरकारनं कमी केल्यानंतर दरेकरांनी दिलेली सुरक्षा जीपही राज यांनी परत केली..हे दरेकर यांच्या जिव्हारी लागलं..त्यातच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचे वाढतं वर्चस्व आणि कृष्णकुंकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळू लागल्यानं दरेकर यांनी अखेर राजनिष्ठेचा झेंडा खाली ठेवला...दरेकरांसारखेच नाशिकमध्ये मनसेचा गड भक्कम करण्यात ज्या वसंत गीतेंनी जीवाचं रान केलं त्यांनाही मागच्या काही महिन्यांपासून डावललं जात होतं. नाशिकमधले पक्षाचे महत्वाचे निर्णय गीते नाहीतर अविनाश अभ्यंकर घेत होते. राज यांनी वसंत गीतेंना डावलून अभ्यंकरावंर जबाबदारी दिली. नाशिकचा महापौर निवडण्यातही वसंत गीते यांना विचारत घेतलं नाही. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असतानाही कुंभमेळ्याच्या निधी आणि विकासकामात गीतेंना डावलण्यात आलं..वसंत गीते नाराजी असताना नाशिकमध्ये येऊनही राज ठाकरेंनी गीतेंची दखल घेतली नाही. त्यातूनच वसंत गीते यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. गीते यांनी मनसे सोडल्यानं नाशिकचा मनसेचा गड आता खिळखिळा झालाय..पुन्हा नाशिकमध्ये मनसेचं इंजिन रुळावर येईल हे अशक्यचं दिसतय... मुंबई आणि नाशिकनंतर मनसेला जिथं चांगला जनाधार आहे ते शहर म्हणजे कल्याण..याच कल्याणनं महापालिका आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलं. त्याच कल्याणचे आमदार रमेश पाटील यांनीही मनसेला रामराम ठोकत मोदी लाटेत उडी घेतली...रमेश पाटलांचा कल्याणमध्ये पक्षावर फारसा फरक पडेल असं नसलं तरी त्यांचा एक माजी आमदार सोडून का गेला त्याचा विचार करावा लागेलच..दरेकर आणि गिते हे दोघेही जनाधार असलेले नेते असल्यामुळं त्यांच्या जाण्यानं मनसेला नुकसान तर भाजपला फायदाच होणाराय. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दरेकर हे भाजपसाठी जमेची बाजू ठरतीलही.पण मनसेच्या तोटा मात्र नक्कीच होणाराय..असे एक एक निष्ठावान कार्यकर्ते सोडून जात असताना राज ठाकरे यांच्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही..मी म्हणजेच पक्ष अशा थाटात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीतूनराज यांनी काही धडा घेतला नाही तर मनसेचं फक्त इंजिनच शिल्लक राहिल... कारण बाळासाहेब ठाकरे यांना अनेक कट्टर समर्थक सोडून गेले तर शिवसेनेला काही फरक पडला नाही त्याचं कारण शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हाच सर्वात मोठी जमेची बाजू होती...पण बाळासाहेब हे बाळासाहेब  होते त्यांचे नेते नाही तर कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे त्यांच्यापाठीशी उभा होता. ही ताकद राज ठाकरे यांच्यामागे नाही..त्यामुळं एक एक शिलेदार सोडून जाणं ही राज यांच्यासाठी चिंतेची बाब आहे..किल्ल्याचा एक एक बुरूज ढासळू नये म्हणून राज ठाकरे आता काय करतात का त्यावरच मनसेचं भवितव्य अवलंबून आहे..   

No comments:

Post a Comment