अखिलेशसिंगच्या प्रयत्नाला जसं यश मिळालं तसं राहुल गांधींना मात्र मिळालं नाही हे या निकालानंतर विचार करायला लावणाराय.राहुल गांधींकडे सर्व यंत्रणा होती..नेत्यांचा, कार्यकर्त्यांची दांडगी संख्या होती . मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी बाटला इनकाऊंटरसह आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं तरिही काँग्रेसच्या कामगिरीत काहीच फरक पडला नाही..पुन्हा त्यांची कामगिरी सुमार दर्जाचीच झाली..उत्तर प्रदेशात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी या पक्षानं सर्व प्रकारचे प्रयत्न करुन पाहिले..मागच्या निवडणुकीत युवराज राहुल गांधींचा आधार घेतला..पण त्या निवडणुकीत मायावतींच्या हत्तींचा धडाका त्यांना रोखता आला नाही तर यावर्षी सायकलनं त्यांना चिरडलं..
उत्तर प्रदेशची ही निवडणूक दोन युवा नेत्यांमुळेही गाजली..एक होते सर्व शक्ती,मोठा लवाजामा आणि एक वलय असलेलं नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते राहुल गांधी तर दुसरं नाव होतं मुलामसिंग यादव यांचे सुपुत्र खासदार अखिलेशसिंह...दोघांनाही राजकीय पार्श्वभूमी असली तरी दोघांची तुलना करता राहुल गांधी हे वरचढच ठरतात...दोघांनीही उत्तर प्रदेश पिंजून काढला..पण यशाची माळ ही अखिलेशच्याच गळ्यात पडली... खरं तर निवडणुकीच्या दोन वर्ष अगोदर समाजवादी पक्ष मरगळलेला होता..त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांची सुन आणि अखिलेशची पत्नी यांचा झालेला पराभव.. मुलायमसिंग यांच्यावर होत असलेले घराणेशाहीचे आरोप आणि बेनामी संपत्तीच्या चौकशीचा फेरा ही सर्व विरोधात जाणारी परिस्थिती असताना अखिलेश यांनी पक्षाची धुरा हाती घेतली..त्यानंतर त्यांनी घेतलेल्या मेहनतीला नुसते यशच मिळाले असे नाही तर समाजवादी पक्षाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमतही मिळवून दिलं. त्यांच्या नेतृत्वावर उत्तर प्रदेशमधल्या तरुण वर्गानं शिक्कामोर्तब तर केलच..पण जेवढं मोठं यश मिळालं त्यावरुन त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं मोठा विश्वास टाकल्याचं दिसतय..
अखिलेश यादव यांच्यावर जेवढा विश्वास तिथल्या जनतेनं टाकला तेवढा राहुल गांधींवर का टाकला नाही हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे..कारण दोघांनाही राजकीय वारसा आहे असं असताना राहुल गांधींचा करिश्मा उत्तर प्रदेशमध्ये का चालला नाही..राहुल गांधींनी काँग्रेसला विशेषतः उत्तर प्रदेशात नवसंजिवनी देण्याचा विडा उचलला होता..पण विधानसभेच्या दोन निवडणुकांत स्वतःला झोकून दिलं असतानाही त्यांना लोकांनी पसंद का केलं नाही ? राहुल गांधी यांचं सल्लागार मंडळ कुचकामी आहे का ? की त्यांचा कार्यकर्ते आणि सामान्य लोकांशी संवाद कमी पडतोय..! याचा विचार होणं गरजेचं आहे..काँग्रेसला उत्तर प्रदेशात पक्ष म्हणून उभं करण्यात तेसुद्धा पार अपयशी ठरलेत हे या निकालावरुन दिसतय..फक्त पराभवाची जबाबदारी घेऊन चालणार नाही तर भविष्याचा विचार करता राहुल गांधी यांना त्यांची रणनिती बदलावी लागणाराय. तरुण मतदारांची नस ओळखता आली पाहिजे तरच राहुल गांधींना त्याचा फायदा होणाराय.अन्यथा लादलेलं नेतृत्व एवढीच त्यांची ओळख राहिल..
No comments:
Post a Comment