Sunday, February 19, 2012

हा बाळासाहेबांचाच करिश्मा..









मुंबई, ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला..मुंबईत तर १६ वर्ष युतीची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी युतीला संधी मिळालीय..यावेळीही शिवसेनेला निवडणूक सोपी नव्हती..खरच सोपी नव्हती..मनसेच्या इंजिनाचा वाढलेला वेग आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी यामुळे शिवसेनेला निवडणुकीत दगाफटका होण्याची भाकितं वर्तवली जात होती..कदाचित जास्त जागा मिळाल्या तरी राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी हात पसरावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ही सगळी भाकितं खोटी ठरवत शिवसेना भाजप रिपाइं युतीचा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर फडकलाच...

निवडणुकीपूर्वीचं वातावरण लक्षात घेवून शिवसेनेनं रामदास आठवलेंना हाक दिली आणि राजकीय अडगळीत पडलेल्या आठवलेंनाही दुसरं मोठं राजकीय व्यासपीठ मिळालं. या निवडणुकीच्या निकालात रिपाइंचे दोनच उमेदवार निवडून आले असले तरी दलित समाजाची जी मतं आठवलेंच्या पाठिशी आहेत त्या मताचं दान यावेळी युतीच्या पारड्यात पडल्यामुळे युतीचा अवघड विजय सोपा झाला.. त्यामुळेच मनसेचा उधळलेला वारु जरी जोरात असला तरी त्याचा दगाफटका युतीनं आठवलेंच्या मदतीनं थोपवला असं म्हणता येईलं, किंबहुना मनसेमुळे होणारा धोका थोपवण्यासाठी आठवलेंच्या मतांचा त्यांना फायदा झाला.. सेनेची आकडेवारी खाली आली असली तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना अडचण येणार नाही..तर दुसरीकडं दोन्ही काँग्रेसही युतीचा झेंडा खाली खेचण्यासाठी एकत्र मैदानात उतरले पण त्यांना ते जमलं नाही..उलट मागच्यावेळी स्वतंत्र लढून जेवढ्या जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या त्याही त्यांना राखता आल्या नाहीत...

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर त्याची अनेक कारणं देता येतील..मुंबईत नेहमीप्रमाणं यावेळीही मतदानानं ५० टक्क्यांचा आकडाही पार केला नाही..त्यामुळे ज्यांनी मतदान केलं ते अर्थातच युतीला फायद्याचं झालं..लोकांना बदल हवा असेल तर मतदानही तेवढ्याच जास्त प्रमाणात होणं अपेक्षीत होतं. त्यामुळेच की काय कमी मतदान हे युतीच्या पथ्यावरच पडलं..दुसरं असं की ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व या निवडणुकीनंतर संपेल अशी भविष्यवाणी केली.राजकीयदृष्ट्या ही टीका शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबणं साहजित होतं..तोच धागा शिवसेनेनं पकडला आणि पुन्हा भावनिक मुद्दा पुढं आला..तर दुसरीकडं शिवसेनेवर ४० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला तोही विरोधकांवर बुमरॅग होऊन उलटला..तसच काँग्रेसला अंतर्गत वादही यश मिळवण्यात अडथळा ठरला..प्रचाराचं नियोजन नाही की सर्व नेत्यांना एकत्र करता आलं नाही. याचा परिणाम झालाच..कृपाशंकरसिंग यांनी तर मुंबईची सत्ता खेचून आणतोच आणि मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतोच अशा आविर्भात सगळी सुत्रं हाती घेतली..कदाचित ती नारायण राणे, विलासराव, गुरुदास कामत यासारख्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नसावं.

तर दुसरीकडं परप्रांतियांच्या आक्रमणाचा मुद्दा, भूमिपुत्रावरचा अन्याय या विषयावर स्थानिक मतं एकत्र होतात. तर काँग्रेससारखे सत्ताधारी पक्ष त्यांकडं दुर्लक्ष करतात..कृपाशंकरसिंग, संजय निरुपम, राजहंससिंह, यासारखे उत्तर भारतीय नेते मुजोर होत आहेत. त्याचा रागही स्थानिक लोकांच्या मनात राहतोच..उत्तर भारतातून पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी आता स्थानिकांना गुरकावतायत..!! तो संजय निरुपउद्योगी ( निरुपम ) मुंबई बंद करण्याची भाषा करतो..!! कुठून आला त्याला हा माज..? कोण तो उपटसुंभ.. ? कुणाच्या जोरावर मुंबई बंद करण्याची भाषा करतो तो..? तर दुसरीकडं म्हशीच्या गोठ्यात काम करणारा तो कृपाशंकर म्हशीवाला...!! कोकणात शंभर एकरापेक्षा जास्त जागा घेतो..उत्तर भारतीयांना एकत्र करुन स्थानिकांना डावलतो. हे मुंबईतल्या भूमिपुत्रांनी का सहन करायचं..? एकच उदाहरण देतो..मुंबई काँग्रेसचा अद्यक्ष असणा-या कृपाशंकरसिंगांची उमेदवार यादी पहा..१६९ जागा ज्या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातल्या फक्त ८९ जागा मराठी लोकांना आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना! हे कसं सहन करायचं..? याच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतला गटनेता राजहंससिंह पालिकेतला कारभार हिंदीत चालवा म्हणून आग्रह धरतो..! हे सर्व मराठी माणूस सहन कसं करेल...? शिवसेना भाजपा युतीचा महापालिकेतला कारभार फार काय चांगला आहे असा त्याचा भाग नाही..आणि त्यांनी काही "करुन दाखवलं" म्हणून त्यांची सत्ता आली असंही म्हणता येत नाही..पण " त्या उप-यांच्या" हाती सत्ता देण्यापेक्षा आपली माणसं का नको हे गणितही त्यामागं आहे..

कारणं काहीही असो..! देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या या मुंबई महापालिकेवर सर्वच पक्ष सत्तेसाठी डोळा ठेवून असतात.२१ हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे या मुंबई माहनगरपालिकेचं..! केंद्रातूनही मोठी आर्थिक मदत मिळत असते मुंबईला..!त्यामुळे ही सोन्याची कोंबडी आपल्या पक्षाकडे असावी यासाठी सर्व पक्ष अगदी आसुसलेले असतात...

मुंबईत आवाज कुणाचा म्हणून विचारण्याचं धाडसही नव्हतं तेव्हाही मुंबई शिवसेनेकडेच होती आणि आता मुंबईतला सेनेचा आवाज कमी झाली असली तरीही मुंबई शिवसेनेचीच आहे..आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंततरी ती शिवसेनेचीच राहिली हे सांगण्यासाठी आता कोणा ज्योतिष्याची गरज नाही...पण या निकालामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा महापालिकेवर मानानं डौलत राहतोय ह्यातूनच ह्या फालतू नेत्यांनी काय तो धडा घ्यावा हेच या निकालाच्यानिमित्तानं सांगणं आहे...!!!!

जय महाराष्ट्र..!!


2 comments:

  1. Farach Chan Lekh aahe tumacha,Avadala Aaplaya,Aanni Sarwana AvdelHi KhtriAahe.
    Ya Congress-Rashtravadi valyani Vat lavli Deshachi ani ata Mumbaichi Pan tich gat Zali Asati, Ya Kripashankarsingh,Nirupam Sarkhye Bhadye tya madamche Pay chatun changli Padye Milavli,anni Tyanna sath Denare te Manikrao Thakre,Gurudas Kamth,Priya Dutt,Ajit Sawant,baba siddiqui,Chandrakant Handore sarkhe Zandubam ,yanchich tyani Changlich Vajavli.tyat Rane , ani bhujbal sarkhi bedke daraw-daraw ordun apla mothepana Dhakhavt Aahet,Mumbaichya Janatene Tyana Apli Jaga Dhakhavli Ahhe,Aata ja Anni ghala tya Madamchya Payghadya.tich Layaki Yanchi.Mumbait Shivseneche Rajya Yene Jaruriche Hote,Karan Mumbait Marathi Manus Tikala to Shivsene Mulech he Visarata kama Naye,Nahitari Kay Dilay Marathi Mansala hya Congress Valyani.Asech Lihit Chala,Thumhala Shubhechya.

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल लाख लाख धन्यवाद..
    आपण आपले नाव लिहिले असते तर आणखीनच
    बरं वाटलं असतं..धन्यवाद..

    ReplyDelete