Monday, December 26, 2011

दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकते तेंव्हा...




२०११ हे वर्ष खऱ्या अर्थानं गाजलं ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे.. अण्णा हे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांची आंदोलनं, त्यातून राज्य सरकारची झालेली नामुष्की आणि एकूणच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्याची अख्या महाराष्ट्राला माहिती आहे..पण २०११ या वर्षात अण्णांची महती देशभरात पोचली..देशभरातच काय जगानंही अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली..या वर्षात अण्णांनी लोकपालसाठी आंदोलनाची सुत्रं हाती घेतली आणि दिल्लीतली हवा तापली..दिल्लीनं अनेक भल्या भल्यांना पाणी पाजलय.. दिल्लीच्या सत्तेचा कैफही काही औरच असतो हे इतिहासापासून आजतागायत सर्वांनी पाहिलाय, ऐकलाय..पण याच दिल्लीला अण्णा हजारेंनी झुकवलं.. तसच महाराष्ट्राच्या एका खेड्यातून आलेला हा धोतरछाप माणूस एवढा महाग पडेल असं सरकारलाच काय पण इतर कोणालाही वाटलं नव्हतं..पण अण्णांनी ते घडवून आणलं..
लोकपालच्या लढाईसाठी अण्णा मैदानात उतरले तेच नेहमीच्या उपोषणाच्या ब्रम्हास्त्रांनं.. सुरवातीला जंतर मंतरवर झालेल्या उपोषणाला प्रतिसादही चांगला मिळाला पण त्यानंतर अण्णांनी रामलिला मैदानावरच्या आंदालनाची हाक दिली..पण त्याअगोदर याच रामलिला मैदानावरचं रामदेव बाबांचं उपोषण सरकारनं पोलिस बळाचा वापर करुन अर्ध्या रात्रीत मोडून काढलं होतं..अण्णांच्या उपोषणाची गतही तिच होईलं अशी भिती व्यक्त केली जात होती..सुरवातीला उपोषणाची परवानगी नाकारुन सरकारनं स्वताहूनच अपशकून घडवून आणला.. लोकशाहीत कोणालाही शांततेत आंदोलन करण्याचा हक्क आहे. पण सरकारनं अण्णांचं आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना परवानगीच नाकारली.. पण अण्णा काय चिज आहे हे दिल्ली सरकारला माहित नव्हतं...त्यामुळेच अण्णांना उपोषणाच्या दिवशीच पहाटे त्यांच्या दिल्लीच्या मुक्कामाच्या जागेवर पोलिसांनी गाठलं..पण अण्णांचा निर्धार पक्का...जेलमध्ये जाईन पण उपोषण करेनच ही भिष्मप्रतिज्ञा अण्णांनी केली..पण पोलीस बिचारे हुकामाचे गुलाम त्यांनी अण्णांना अटक केली....ही सरकारनं केलेली दुसरी चूक....
अण्णा हजारे नावाचा हा मराठी माणूस कीती हट्टाचा आहे ते दिल्लीला माहितच नव्हतं.. शेवटी अण्णांना तिहार तुरुंगात पाठवलं...गम्मत अशी की ज्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा लढा देत आहेत..त्याच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही नेते, माजी मंत्री आणि मोठ्या कार्पोरेटमधले उच्चपदस्थ अधिकारी त्याच तिहारमध्ये डांबलेले होते...सरकारची पुन्हा व्हायची तेवढी छी थू झाली...शेवटी अण्णांना तिहारमधून सो़डवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.. पुन्हा सरकार चुकलं..पण तोपर्यंच दिल्ली, संपर्ण देश आणि प्रसारमाध्यमांना अण्णा काय चिज आहे हे कळून चुकलं.. सरकारवर दबाव वाढला आणि त्यांना झक मारत अण्णांच्या उपोषणाला परवानगी द्यावी लागली...
रामलिला मैदानावर ठाण मांडताच अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला..आपल्या सर्व मागण्यांसह लोकपाल विधेयकाला हात घाला अन्यथा उपोषण सोडणार नाही...मरेन पण हटणार नाही या इशाऱ्यामुळे सरकारलाही धडकी भरली.. सरकारला वाटलं दोन तीन दिवसात अण्णा जमीनीवर येतील..तब्येत बिघडेल हॉस्पीटलमध्ये पाठवून देऊ..पण कुठे काय...अण्णा ठणठणीत...टीव्ही वाहिन्यांवर दिवसभर अण्णापुराण तर दुसरीकडं संसदेचं अधिवेशन सुरु, त्यामुळे सरकारला नमतं घेण्याशिवाय पर्याय नव्हता...संसदेत आणि संसदेबाहेर सरकारची होती नव्हती तेवढी सगळी पार धुळीला मिळाली..त्यामुळे संसदेनं एकमुखानं अण्णांच्या मागण्यावर विचार करायला सरकारला भाग पाडलं..शेवटी पंतप्रधांनांनी लेखी पत्र पाठवल्यानंतरच अण्णांनी रामलिलावरचं उपोषण सोडलं...तर दुसरीकडं दिल्लीच्या सरकारनही सुटलो बुवा आता असं म्हटलं...
या संपूर्ण आंदोलनाची दखल मिडीयानं घेतली..महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेडातल्या या गांधीवादी नेत्यानं उपोषणाच्या जोरावर दिल्लीच्या सरकारची झोप उडवली हेच त्यांच्यासाठी आश्चर्याचं होतं..त्यात मिडीयानं दखल दिल्यामुळे सर्वांनाच त्याची दखल घ्यावी लागली..म्हणूनच अण्णा घराघरात पोचले तसच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली...त्यामुळेच अण्णा खऱ्या अर्थानं २०११ या वर्षाचे हिरो ठरले...कारण त्यांना पाठिंबा देणारा वर्ग हा सर्व वयोगटातला होता...सर्व वर्गातला होता.. अण्णांच्या भूमिकेवर काही वाद असू शकतात.. त्यांच्या हट्टीपणावर काही आक्षेप असू शकतात...मी म्हणतो तेच बरोबर या प्रवृत्तीवर आक्षेप असू शकतो...पण अण्णांच्या पायासमोर दिल्लीचं तख्तही झुकलं यातच सर्वकाही आलं...
जय महाराष्ट्र...

1 comment: