Friday, November 25, 2011

अण्णा ! जरा जपून बोला...




जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी त्यांच्या बोलण्यानं या आठवड्यात पुन्हा वाद निर्माण केले..अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधातल्या लढ्यामुळे त्यांची ख्याती देशभरातच नाहीतर जगाच्या पाठीवरही पोचलीय...पण कधी कधी अण्णा स्वतःच्याच बोलण्यानं टीकेचे धनी होतात...त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे..अण्णांचा लढा मोठा आहे..त्यांच्यामुळे राज्यात काही कायदे झाले, माहितीचा अधिकार हा कायदा आला..त्यांनी केलेल्या अनेक उपोषणाला यश आलं.. हे सर्व मान्य असलं तरीही एवढ्या मोठ्या माणसानं बोलताना संयम बाळगावा हे त्यांना आता कोणीतरी सांगायला हवं..पण का कोण जाणो अण्णा स्वतःच स्वतःच्या बोलण्यानं वाद ओढवून घेतात...त्याचा पुन्हा प्रत्यय या आठवड्यात आला...तो शरद पवार आणि दारू पीणाऱ्यांना खांबाला बांधून फटके दिले पाहिजेत ह्या त्यांच्या दोन विधानानं...
शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत..राज्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे... त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काही मतभेद असू शकतात...पण महाराष्ट्राच्या या मोठ्या नेत्याचा जेव्हा एका पंजाबी माथेफिरुनं त्यांच्यावर हल्ला केला...कृपाण काढून तो धमकावू लागला.. त्यांचा एवढा मोठा अपमान झाला..हा सारा प्रकार निषेध करण्यासारखाच आहे.. त्या माथेफिरुचं कोणत्याच बाबतीत समर्थन होऊ शकत नाही.. पण हा सारा प्रकार घडल्यानंतर अण्णा हजारे यांना पत्रकारांनी प्रतिक्रीया विचारली असता उपहास करत...एकच मारली का असा सवाल केला.. त्यावेळी तिथं जमलेले काही महाभाग हसलेही... खरं तर अण्णा हजारेंनी अशी प्रतिक्रिया देणं योग्य आहे का.. ?.पवारांशी त्यांचे काही मतभेद असतीलही म्हणून काय पवारांवर झालेल्या हल्ल्याचा असा उपहास करायचा....? काय अधिकार आहे अण्णा हजारेंना अशा प्रकारे प्रतिक्रीया देण्याचा..?.पण जेंव्हा त्यांची प्रतिक्रीया टीव्ही वाहिण्यांवर प्रसारित झाली त्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली..त्यानंतर अण्णांच्या लक्षात ही बाब आली आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याची सारवासारव केली..तसच प्रकरण अंगलट येतय असं लक्षात येताच माफी मागण्याची तयारी दाखवली....हे अण्णांना शोभणारं नाही....
दुसऱ्या एका प्रकरणात दारु पिणाऱ्यांना खांबाला बांधून मारलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं...दारूचे दुष्परिणाम असतात..त्याचं व्यसन ज्यांना लागलय त्यापासून त्यांना परावृत करणं हे महत्वाचं आहे..पण त्याला खांबाला बांधून फटके द्या असं म्हणण्याचा अण्णा हजारेला कोणी अधिकार दिला..? स्वतः गांधीवादी आहे असं म्हणायचं..अहिंसेचा मार्ग सांगायचा आणि स्वतःच हिंसक विधानं करायची हा काय प्रकार आहे...? मुळात या दोन्ही प्रकारात अण्णांना बोलण्याची गरजच नव्हती..पण प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यानंतर जे होतं तेच अण्णा हजारेंचं होत आहे...मग काही हिंदुत्ववादी संघटना जेव्हा व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रकाराला विरोध करत तरुण तरुणींना मारहाण करतात त्यांच्यात आणि या अण्णा हजारेंमध्ये फरक तो काय राहिला...? हा कसाला आलाय गांधीवाद..? त्यामुळे अण्णा जरी वयाने कीतीही मोठं असले तरी बोलताना थोडी काळजी घ्यायला नको का...पण नाही उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणं अण्णांची गत झालीय... त्यामुळे अण्णा...दुसऱ्याला उपदेश देण्यापूर्वी जरा जपून बोला.....नाहीतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले तसं हा कसाला गांधी हा तर वाकड्या तोंडाचा गांधी...असं लोकही म्हणतील.....
( या अगोदर मी माझ्या ब्लॉगवर अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनावर खूपच सकारात्मक बाजूनं लिहिलंय..पण त्यांची आत्ताची बेताल वक्तव्यं टीका करण्यासारखीच आहेत...त्यामुळे हा ब्लॉग लिहणं मला भाग पडलं.. )

No comments:

Post a Comment